अतीत

त्या दिवशी दोन मनांच मनोमिलन जुळून येणार होते.अमरावती च्या कॉलेज मध्ये एक नवीन चाप्टर ला सुरुवात होणार होती.नकुल आणि नेहा हे पहिल्यांदाच एकमेकांना भेटणार होते. दोघांच्याही मनात तशी कल्पना पण नसेल कि आपल्या जीवनाला इथून नवी कलाटणी बसणार म्हणून.
एकाच क्लास मध्ये असल्यामुळे त्या दोन मनांच मिलन हे घडून येणारच होत.तस तर आपण खूप लोकांना रोज भेटतो,खूप साऱ्या सुंदर मुलींना पण भेटतो किंवा पाहतो,आणि मुलींना पण रोज कितीतरी मूल भेटतही असतील आणि पहातही असतील.परंतु ते म्हणतात जोडीया उपर वाले की मर्जी से ही बनके आती है.नकुल आणि नेहा ची जोडी पण परमेश्वराने बनवली अस म्हणण्यात काही वावग ठरणार नाही.त्यांच्या मिलनाचा योगायोग हा कॉलेज चा होता.परीक्षेच्या दिवशी एकमेकांची ओळख पटली होती.त्यांच्यामध्ये ओळख करून द्यायला कोणाची मध्यस्थी हे एक विशेष.त्याला तिच्याशीच का बोलावं वाटलं हे मात्र देव जाणे,कारण कॉलेज च्या कॅम्पस मध्ये मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या मुली असताना हा तिच्याकडेच आकर्षित झाला याच नवल वाटायला हवं.नेहा ही दिसायला सुंदर आहेच.तिचा तो गोरा गोरा चेहरा,मोठमोठे चेहऱ्याला शोभतील असे मृगनयनी डोळे,बदामी लाल लाल ओठ,पातळ नाक,व नाकाचा फुगलेला शेंडा हा तिच्या सौन्दर्यात वेगळीच भर घालत होता.एवढं सगळं सौंदर्य असूनही देवाने तिला अगदी साधी राहणीमान प्रदान केले आहे.त्यामुळे तिला बघून माझ्या नकुल ची विकेट तर नो बॉल वर पण जाणार च होती.तीच ते साध्य सरळ सौंदर्य बघून तो लोहचुंबकप्रमाणे तिच्याकडे खेचला गेला होता.नजरेला नजर भिडली गेली होती.काही क्षण तर दोघांनाही बोलायसाठी काही शब्दच फुटत नव्हते.तसेच एकमेकांकडे बघत ते हरवून गेले होते.भानावर आले तेव्हा नकुल ने सुरवात केली.तो पण थोडा गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याशी बोलत होता.दोघांनी एकमेकांना आपला इन्ट्रो दिला व एक नवीन प्रवासात दोघेही सरसावू लागले.या नवीन प्रवासाची सुरवात तर झाली होती परंतु नकुल आणि नेहा ला प्रवासाचे शेवटचे ठिकाण काय असणार हे माहीत नव्हते,ते त्यांनाच ठरवावं लागणार होतं.रोज भेट होत होती व तिलाही आता नकुल ची सोबत हवीहवीशी वाटायला लागली होती.भेटल्यावर गप्पांची सुरवात व्हायची.त्यावेळेस ते एकमेकांत हरवून जायचे.दोघांना एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटायला लागली होती.ती बाहेर गावाला राहायची त्यामुळे कॉलेज ला पण रेग्युलर नव्हती तेव्हा त्यांची भेट ही कधितरी होत होती.ती परीक्षेच्या दिवशी आली की त्यांची भेट होत होती.नकुल ला भेटली की अस वाटायचं की आमच्या पठ्ठयाने खूप मोठा वनवास संपवला असा तो उत्साही आणि आनंदी तिला भेटायच्या दिवशी असायचा.ती भेटणार आहे त्या दिवशी तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपवता लपवल्या जात नव्हता.एक वेगळीच चमक त्याच्या चेहऱ्यावर असायची.भेटले की कुठेतरी एखाद्या कॅफेमध्ये बसायची इच्छा कुणालाही करणार तशी यांनाही होतीच आणि बसून मनसोक्त गप्पा मारायच्या.गोष्टी शेयर करायच्या,मन मोकळे करायचे असे कार्यक्रम त्यांचे चालायचे.गेली सात आठ महिने यांचं हे असंच चालत होत.कधीतरी भेटणे,फोनवर खूप वेळ बोलणे व बोलता बोलताच एकमेकात हरवून जाणे हे यांच्यासाठी एक सवयच बनली होती.नकुलच्या मनातही एक उत्सुकता होती आणि नेहा च्या पण.नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात ते अडकले होते.ती खुल्या मनाने ही गोष्ट बोलत नव्हती व नकुल ला पण तिला गमवायची इच्छा नव्हती.त्याची अवस्था तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच झाली होती.प्रपोज करायचा तर कसा आणि काय बोलावे हे त्याला सुचत नव्हतं.मनात अनेक विचारांचं काहूर माजायच.तिला ही गोष्ट पसंत पडणार की नाही,तिच्याशी नात तुटलं तर काय होईल अशा अनेक विचारांचं वादळ त्याच्या डोक्याची भंबेरी उडवत होत.परंतु त्याला राहवल्याही जात नव्हते. म्हणून खूप हिम्मत करुन एके दिवशी त्याने तिच्याकडे मन मोकळं केलंच व आपलं प्रेम व्यक्त करून कुठल्यातरी जाळ्यातून मुक्त झाल्यासारखं त्याला वाटत होतं.ती काय प्रतिसाद देईल,ती हे नातं स्वीकारणार की नाही,की इथेच या नात्याला फुल स्टॉप लागेल अशी भीती नकुल ला खात होती.परंतु तस काही झालं नाही.उलट त्याला सुखद आणि गोड धक्का त्याला देत नेहानेही ते प्रेम आणि सगळं काही स्वीकार केलं.त्यावेळेस तर नकुल ची अवस्था बघण्यालायक होती.जंगली चित्रपटातील शम्मी कपूर साहेबांचं गाणं आहे न कोई मुझे जंगली कहे त्यामध्ये जसे शम्मी कपूर साहेब बर्फाच्या पांढऱ्या चादरीवर कलाटन्या मारतात तसे याला ही नक्कीच तसच काहीतरी कराव वाटत असणार अशी त्याची अवस्था होती.जमिनीवर त्याचे जणू पायच थांबत नव्हते.अगदी इतका तो आनंदी आणि उत्साही दिसत होता.नकुल पाहायला सावळा आहे परंतु चेहऱ्यावरील त्याच ते तेज कोणालाही आकर्षित करण्यासाठी पुरेस आहे.मग नेहा तर नक्कीच त्याच्याकडे आकर्षित होणार होतीच.दोघांनी प्रेमाचा स्वीकार केल्यावर सगळं काही नीट चाललेलं होत.परंतु नेहाच्या मनात काहीतरी वेगळंच वादळ होत.तिच्या अतीत च.हो नकुल च्या आधी भूतकाळाच्या डोहात उडी मारली तर तीच एक जून रिलेशनशिप होत जे कायमच आता संपलेलं होत व नकुलसोबतचा तिचा प्रवास सुरु झाला होता.परंतु तिला ही गोष्ट नकुल ला सांगायची होती.त्याच्याकडून काहीही लपवून ठेवायची इच्छा तिची नव्हती.म्हणून तीच मन कासावीस होत होत.शेवटी तिने निश्चय केलाच की आपण सर्वकाही नकुल ला सांगून टाकूयात.मन मोकळं करून घ्यायचं.नकुल ला आपण कुठल्याही गोष्टींपासून परदा नाही करायचा.तेव्हा तिने एकेदिवशी नकुल ला सांगून टाकले व मोकळी झाली.परंतु नकुल ला याचा कुठलाही परिणाम होणार नव्हता.कारण त्याने मोकळ्या मनाने तिचा सर्व गोष्टी सोबत तिचा स्वीकार केला होता.प्रपोज करताना त्याने हा विचार नव्हता केला की नेहा च आधी पण कुठलं रिलेशनशिप होत मग मी का तिच्यावर प्रेम करायला हवे असा कुत्सित आणि तुटपुंज्या विचारांचं नकुल नाही हे त्याने नेहा ला स्वीकार करताना सिद्ध केलं होतं.म्हणून त्याच्यावर या गोष्टींचा कुठलाही परिणाम होणार नव्हताच.उलट एक अभिमान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता कि व्व्वा मला एक प्रामाणिक सोबती नेहाच्या रुपात भेटला आहे म्हणून.नेहलाही या गोष्टींचा अभिमान वाटला असेलच की तिलाही तीच सर्वस्व स्वीकारून आपल्याला एक निस्सीम प्रेम करणारा साथीदार मिळाला आहे म्हणून.
आता नंतर काय???याच प्रश्नाचं कोड नेहा कडून सुटत नव्हतं.तिच्या घरचे या नात्याला स्वीकार करणार की नाहीत?काय म्हणतील ते?काय होईल आपल्या या प्रेमाच्या नात्याचं?असे अनेक प्रश्न नेहा च्या मनात उदभवत होते.आपल्यामुळे किंवा आपल्या घरचयांमुळे नकुल ला काही त्रास नको व्हायला याची काळजी सतत नेहा ला होत होती.याच गोष्टींची चिंता तिला खात होती.तेव्हा नकुल ने तिला समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता की काही नाही होणार तू फक्त धीर धर व आपल्या प्रेमासाठी आपल्या नात्यासाठी तटस्थ राहा.मी तुझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी सगळ्या जगाशी लढायला तयार आहे.आणि नकुल आहे पण तसाच.त्याला त्याची एखादी मनपसंत व्यक्ती असो वा एखादी वस्तू असो ती तिला हसिल करतो म्हणजे करतोच एवढा हिम्मतवाला आमचा नकुल आहेच.तेव्हा मग हे तर त्याच प्रेम आहे.त्याच्या प्रेमासाठी तर तो काहीही आणि कुठल्याही थराला जाण्याची हिम्मत तो ठेवतो.तो तिला यावर धीर देत होता व समजूत काढत होता.परंतु नेहा ला त्याची खूप चिंता होत होती म्हणून ती थोडी घाबरून होती म्हणून त्यांचं थोडं बोलणंही कमी झालं होतं.नकुल ला काहीतरी त्रास होईल या विचाराने ती एक पाऊल मागे घेण्याचा विचार करत होती.
परंतु तिने सोबत हा पण विचार करायला हवा कि आपल्या सरस्वासोबत स्वीकार करणारी ही व्यक्ती जर आपण गमावली तर परत आपल्याला एवढं प्रेम करणार कोणी नाही भेटणार.जो सर्व जगासोबत आपल्यासाठी भिडण्याची तयारी दाखवतो ती व्यक्ती जर गमावली तर परत नाही मिळणार.खूप क्वचितच काही भाग्यवान लोक असतात अशी ज्यांना असा सोबती भेटतो.
म्हणून अस वाटते नेहा पण नक्कीच हा विचार करेल.तिचंही मन तिला म्हणेल की’काय करत आहेस नेहा तू समोरची भीती मनात ठेवून हातातील प्रेम गमवायला निघालीस.खूप भाग्यवान आहेस तू की नकुल सारखा तुझ्यासाठी भिडणारा सोबती भेटला आहे,तुझ्या मागचा पुढचा कशाचाही विचार न करता मोकळ्या मनाने तुझ्यावर प्रेम करणारा सोबती भेटला आहे तुला.मग एवढी भीती कशाची आहे तुला.निडर हो,सक्षम हो एक सक्षम जोडीदार जो कोणाला भेटत नाही तो तुला भेटला आहे.
मग कशाची भीती बाळगते,घे एक पाऊल पुढे तू पण,आणि आपलं प्रेम मिळवा.संकट आणि त्रास तर प्रत्येकाला आहेच मग त्यांची भीती बाळगून कोणी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो का???नाही नेहा नाही उलट हिम्मत करून आणि जगाशी भिडून तिला मिळवण्यासाठी धडपड आपण करायला पाहिजे.म्हणून नेहा तू पण उठ आणि कशाची ही भीती न बाळगता लढ आपल्या प्रेमासाठी,भीड अकख्या दुनियेशी.आभाळा एवढं प्रेम करणारा साथीदार मिळाला आहे तुला तू पण तेवढंच त्याच्या पदरात टाक,त्याहीपेक्षा जास्तच तू करायला हवं……भीड नेहा भीड,मिळव आपलं प्रेम….
ही नकुल आणि नेहा ची कहाणी काल्पनिक नसून पूर्णपणे वास्तववादी आहे.म्हणून बघू पुढे नेहा आणि नकुल च काय होते तर…….तोपर्यंत तुम्ही पण आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी धडपड करा आणि आपल्या सोबत्यासोबत जीवनाचा आनंद घ्या..
✍🏻शुभम सिरसाठ✍🏻
9405301614

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started