बुद्धिमत्ता हा एक खर बघितल्यास गंभीर प्रश्न आहे
जीवनाच्या प्रवासात आपल्या आयुष्याची इमारत उभी करताना आपण जो मार्ग निवडतो त्या मार्गावर प्रवास करताना आपल्याला जे यश किंवा अपयश येते त्याच खर उत्तर म्हणजे आपण निवडलेल्या दिशेमध्ये दिसून येते।कारण बुद्धिमत्ता ही सर्वांमध्येच असते,अस नाही कि त्याच्यामध्ये आहे आणि या व्यक्तीमध्ये नाही।
त्याआधी जर आपल्याला स्वतःची ओळख झालीच नाही किंवा आपल्यामध्ये काय विशेष आहे याची ओळख आणि जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रवासात यशस्वी होऊच शकत नाही।यशाच्या वाटेवरच सर्वात मोठं सत्य म्हणजे स्वतःची ओळख।
अरे तू स्वतःला ओळख आणि मग तुझ्या आवडीचं क्षेत्र निवड त्यामध्ये उत्तम अशी प्रतिभा मिळव त्यामध्ये चांगलं कार्य करून मग स्वतःच्या कीर्तिची ओळख संपूर्ण जगाला दाखव हेच तुझं खर यश।
ही स्वतःची ओळख म्हणजे आपल्या समोर खूप अशी जिवंत उदाहरण आहेत ज्यांच्यापासून आपण आदर्श घेऊ शकतो।मग त्यामध्ये आपण लता दीदी पण आहे,विराट कोहली पण आहे,गायन क्षेत्रातील आज नवीन चेहरा सलमान अली पण आहे।यांनी ज्याप्रकारे आपल्या स्व ला ओळखलं व आपलं क्षेत्र निवडलं त्यामुळे आज त्यांची कीर्ती सर्व जगासमोर झळकत आहे।
जोपर्यंत आपण अपल्यातील स्व ओळखत नाही आणि त्याप्रमाणे त्यावर कार्य करत नाही तोपर्यंत आपल्याकडे कितीही बुद्धिमत्ता असली तरी त्या बुद्धिमत्तेला दिशाहीन बुद्धिमत्ता म्हणता येईल।

प